नागपुर : इटारसी येथील रहिवासी श्री. रघुवीर पाल यांना अनेक वर्षांपासून सतत घुडघ्याचा त्रास होत होता, ज्यामुळे त्याची चालण्याची क्षमता आणि जीवनमान खूप प्रभावित झाले होते. रोजच्या हालचाली जसे की चालणे, जिन्यावर चढणे, आणि जास्त वेळ उभे राहणे, यांसारख्या दैनंदिन गोष्टी त्याच्यासाठी खूप वेदनादायक आणि कठीण झाल्या होत्या.अनेक ऑर्थोपेडिक तज्ज्ञांकडे सल्ला घेतला आणि औषधे, फिजिओथेरपी, आणि जीवनशैलीत बदल यासारखे विविध उपचार करून बघितले, तरी त्याला फारसा आराम मिळाला नाही.
कालांतराने त्यांची समस्या अधिक वाढत गेली. तपासणीत त्यांना ग्रेड IV घुडघ्याचा संधिवात असल्याचे निदान झाले. ही संधिवाताची सर्वात गंभीर अवस्था असून यात सांध्याचे पृष्ठभाग पूर्णपणे खराब होतात. नॉन-सर्जिकल उपचारांचा कोणताही फायदा न झाल्यामुळे त्यांना वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर येथील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. मुकुंद अग्रवाल यांच्याकडे पाठवले गेले. डॉ. अग्रवाल हे रोबोटिक आणि (मसल-स्पेअरिंग) स्नायू सांभाळून घुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत तज्ज्ञ आहेत.
सर्व क्लिनिकल तपासण्या आणि इमेजिंग रिपोर्ट पाहिल्यानंतर, डॉ. मुकुंद अग्रवाल यांनी श्री. पाल आणि त्यांच्या कुटुंबियांला उपचार योजना सविस्तरपणे समजावून सांगितली. संधिवात खूप गंभीर होता आणि घुडघ्यात जास्त वाकडेपणा होता, त्यामुळे डॉ. अग्रवाल यांनी एआय-चालित रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण घुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करण्याची शिफारस केली. या आधुनिक शस्त्रक्रियेमुळे शस्त्रक्रिया अधिक अचूक होते, सांधा योग्य पद्धतीने बसतो, आजूबाजूच्या स्नायूंना कमी नुकसान होते आणि रुग्ण लवकर बरा होतो.
त्यानंतर श्री. पाल यांच्यावर वोक्हार्ट सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर येथे एआय- आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून पहिली पूर्ण घुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. मुकुंद अग्रवाल यांनी केलेली ही शस्त्रक्रिया या भागातील रोबोटिक ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली. या प्रगत रोबोटिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेच्या वेळी तात्काळ नियोजन करता आले आणि रुग्णाच्या शरीररचनेनुसार घुडघ्याचे इम्प्लांट अत्यंत अचूकपणे बसवता आले.
शस्त्रक्रियेनंतरचे परिणाम खूपच चांगले होते. शस्त्रक्रियेनंतर अवघ्या आठ तासांतच श्री. पाल यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली उभे राहायला आणि चालायला सांगण्यात आले. हे रोबोटिक आणि स्नायू सुरक्षित ठेवणाऱ्या तंत्रज्ञानाचे मोठे फायदे दाखवते. त्यांना शस्त्रक्रियेनंतर फार कमी वेदना झाल्या, गुडघ्याची ताकद सुधारली आणि हालचालीत लवकर सुधारणा झाली. कमी आक्रमक शस्त्रक्रिया असल्यामुळे त्यांना दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.
आपल्या भावना व्यक्त करताना श्री. पाल म्हणाले की, वर्षानुवर्षे वेदना सहन केल्यानंतर, ते आता वेदनांशिवाय चालू शकत आहेत आणि हालचाली करताना त्यांचा आत्मविश्वास परत आला आहे. “शस्त्रक्रियेनंतर इतक्या लवकर वेदनांपासून आराम मिळेल, असे मला कधीच वाटले नव्हते. या उपचारामुळे मला खरोखरच नवीन आयुष्य मिळाले आहे,” असे त्यांनी सांगितले.
हे यश नागपूर येथील वोक्हार्ट हॉस्पिटल्ससाठी एक मोठी उपलब्धी आहे आणि यामुळे रुग्णांना अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाची उपचारसेवा देण्याची हॉस्पिटलची बांधिलकी अधिक मजबूत झाली आहे. डॉ. मुकुंद अग्रवाल सारख्या अनुभवी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे हॉस्पिटल मध्य भारतातील रुग्णांसाठी रोबोटिक ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेत नवीन मानके स्थापित करत आहे.
एआय-चालित रोबोटिक घुडघा
प्रत्यारोपणासारख्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे गंभीर संधिवाताने ग्रस्त असलेल्या रुग्णांना आता लवकर बरे होणे, अधिक चांगले उपचार परिणाम आणि वेदनामुक्त व सक्रिय जीवन जगण्याची नवी आशा मिळाली आहे.

1 Comments
Great Blog. Looking for best orthopedic hospital in nagpur. Ortho Relief is the best orthopaedic hospital in Nagpur for knee replacement, hip replacement, spine surgery, and fracture care by expert orthopaedic surgeons.
ReplyDelete