थोडक्यात पण महत्त्वाचे
• अदाणी विद्यापीठाचा दुसरा दीक्षांत समारंभ संपन्न झाला. या समारंभात 87 पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये तीन गुणवंत विद्यार्थ्यांचाही समावेश होता.
• समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवत डॉ. प्रीती जी. अदाणी यांनी भारताच्या वेगाने वाढणाऱ्या प्रगतीचा, आपल्या संस्कृतीच्या भक्कम वारशाचा उल्लेख केला आणि भविष्यातील नेत्यांनी जनजीवन सुधारण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे सांगितले.
• क्वालकॉम इंडिया चे अध्यक्ष सावी एस. सोईन यांनी दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना उद्देशून भाषण केले आणि भारताच्या वेगाने वाढणाऱ्या तांत्रिक प्रगतीवर आणि उद्योग व शिक्षण क्षेत्रातील सहकार्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.
• विद्यापीठानेही भविष्यासाठी तयार विद्यार्थी घडवण्याच्या आपल्या ध्येयाची पुष्टी केली आणि नवोपक्रमावर आधारित नवीन कॅम्पस उभारण्याच्या योजनांना गती देण्याची घोषणा केली
अहमदाबाद, 6 डिसेंबर 2025 : अदाणी विद्यापीठाचा दुसरा दीक्षांत समारंभ शनिवारी शांतीग्राम येथील विद्यापीठाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात झाला. या समारंभात 87 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली, ज्यामध्ये तीन गुणवंत पदक विजेतेही होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांचे कुटुंबीय, शिक्षकवर्ग, संचालन मंडळाचे सदस्य, उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि विशेष पाहुणे उपस्थित होते.
या समारंभात 79 एमबीए (इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट) पदवीधर आणि 8 एम.टेक (कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट) पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. समारंभाचे अध्यक्षस्थान अदाणी विद्यापीठाच्या अध्यक्षा आणि अदाणी फाउंडेशनच्या चेअरपर्सन डॉ. प्रीती जी. अदाणी यांनी भूषवले.
आपल्या भाषणात डॉ. अदाणी यांनी भारतातील पायाभूत सुविधा आणि विकासाच्या क्षेत्रात होत असलेल्या मोठ्या बदलांकडे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की डिजिटल परिवर्तन, शाश्वत विकास आणि लोककेंद्रित व्यवस्था आता देशाच्या प्रगतीचे मुख्य आधार बनत आहेत.
त्यांनी सांगितले की, पायाभूत सुविधा शेवटी समाजाच्या सेवेसाठीच असायला हव्यात. फक्त कनेक्टिव्हिटी आणि सुविधा निर्माण करणे पुरेसे नाही, तर लोकांना अधिक चांगले आरोग्य, सुरक्षितता आणि संधी मिळतील अशी व्यवस्था तयार करणे ही आपली मोठी जबाबदारी आहे. प्रगतीची मोजणी आता फक्त वेग, प्रमाण किंवा कार्यक्षमतेने नाही होणार, तर आपल्या नागरिकांचे जीवन किती सुधारले आहे यावर होणार आहे.” त्या पुढे म्हणाल्या की पायाभूत सुविधांचे पुढील दशक "अधिक बांधकाम करण्याबद्दल नाही; ते अधिक चांगले बांधकाम करण्याबद्दल आहे.
भारताच्या समृद्ध संस्कृतीला ताकद आणि प्रेरणेचा स्रोत मानून, डॉ. अदाणी यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की त्यांनी स्वतःला उभरत्या भारतासाठी योगदान देणारे नागरिक म्हणून पाहावे. हा विचार अदाणी समूहाच्या ‘इंडॉलॉजी’ उपक्रमाशी आणि राष्ट्रनिर्माणाच्या त्यांच्या वचनबद्धतेशी निगडित आहे.
“तुम्ही अशा संस्कृतीचे वारसदार आहात ज्याने सखोल विचार केले, धाडसाने काम केले आणि नैतिकदृष्ट्या नेतृत्व केले. ही परंपरा तुमच्या करिअरमध्ये फक्त आठवणी किंवा इतिहास म्हणून नव्हे, तर एक जबाबदारी म्हणून घेऊन जा.”
पदवीधरांना प्रोत्साहित करत त्यांनी विद्यार्थ्यांना संशोधनाकडे वळण्याचे, विविध क्षेत्रांचे ज्ञान एकत्र करण्याचे आणि नैतिकतेवर आधारित नवोन्मेषाद्वारे भारताच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले. डॉ. अदाणी यांनी विद्यापीठाच्या नवीन, भविष्यासाठी तयार कॅम्पसच्या योजनांचीही आठवण करून दिली, जेथे संशोधन, सहकार्य आणि उद्योगासह शिक्षण यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
दीक्षांत समारंभातील भाषण श्री सावी एस. सोईन, अध्यक्ष, क्वालकॉम इंडिया यांनी दिले. त्यांनी विद्यार्थ्यांचे आणि पदकधारकांचे अभिनंदन केले आणि सेमीकंडक्टर, मोबिलिटी, एआय, कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल पायाभूत सुविधासह भारताच्या प्रगत तंत्रज्ञानातील वाढत्या नेतृत्वावर प्रकाश टाकला.
ते म्हणाले: “जसे भारत सेमीकंडक्टर, एआय, मोबिलिटी आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये आपले नेतृत्व वेगाने वाढवत आहे, तसतसे उद्योग आणि शिक्षण संस्था यांच्यातील भागीदारी अधिक महत्त्वाची झाली आहे. अदाणी विद्यापीठाचा बहुविषयक शिकण्याची पद्धत विद्यार्थ्यांना केवळ या बदलात सहभागी होण्यास तयार करत नाही, तर नवोपक्रम, अनुकूलता आणि भारतातील प्रत्यक्ष समस्या सोडवण्याच्या दृष्टीने जागतिक दृष्टिकोन ठेवून नेतृत्व करण्यास तयार करते.”
श्री सोईन यांनी विद्यार्थ्यांना सतत शिकत राहण्याची, संपूर्ण प्रणालीचा विचार करण्याची, नैतिक नेतृत्वाची आणि शाश्वततेची जाण ठेवण्याची क्षमता विकसित करण्यास प्रोत्साहित केले, जे आधुनिक आणि सक्षम भारत घडवण्यासाठी अत्यावश्यक आहे.
समारंभाचा समारोप ग्रुप फोटो घेऊन झाला, ज्याने पदवीधर विद्यार्थ्यांसाठी अभिमानाचा क्षण निर्माण केला आणि सर्व 87 पदवीधर तसेच 3 गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यात आला.
2022 मध्ये स्थापन झालेले अदाणी विद्यापीठ आता भविष्यास अनुकूल शिक्षणाचे केंद्र म्हणून विकसित होत आहे. हे विद्यापीठ तंत्रज्ञान, संशोधन आणि उद्योग सहकार्य यांचे एकत्रीकरण करून वेगाने बदलणाऱ्या जगासाठी सक्षम नेते घडवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
अदाणी विद्यापीठाबद्दल :
अदाणी विद्यापीठाची संकल्पना पायाभूत सुविधा, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि डिजिटल आरोग्य या क्षेत्रातील बहुविषयक संशोधन, ज्ञान निर्मिती आणि शिक्षण प्रक्रियांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये उच्च शिक्षणासाठी एक संपूर्ण परिसंस्था दृष्टिकोन स्वीकारला जातो, ज्यामध्ये फक्त अभ्यासक्रम, विषय आणि संशोधन नव्हे, तर कौशल्य विकास, व्यावसायिक विकास, शिक्षक प्रशिक्षण, उद्योजकता विकास, नवोपक्रम, उत्पादन विकास, बौद्धिक संपदा निर्माण, गुणवत्ता आणि प्रमाणपत्र, सल्लागार सेवा आणि उद्योग व जागतिक संस्थांसह सहकार्याद्वारे संयुक्त संशोधन यांचा समावेश आहे. सध्या विद्यापीठ इंजिनिअरिंग, तंत्रज्ञान आणि व्यवसाय व्यवस्थापन (अंडरग्रॅज्युएट आणि पोस्टग्रॅज्युएट) अभ्यासक्रम (बी.टेक, एम.टेक आणि एमबीए), लवचिक एनईपी अनुरूप एकत्रित बी.टेक + एमबीए आणि बी.टेक + एम.टेक प्रोग्राम तसेच 1800+ विद्यार्थ्यांसह बहुविषयक डॉक्टोरल प्रोग्राम (पीएचडी) ऑफर करत आहे. अदाणी विद्यापीठ हे गुजरात राज्यातील पहिले विद्यापीठ आहे ज्याने ISO 21001:2018 प्रमाणपत्र प्राप्त केले आहे, जे उच्च शिक्षण व्यवस्थापनासाठी सुवर्ण मानक मानले जाते.

0 Comments