नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2026 : नवी दिल्लीस्थित सार्वजनिक धोरण विचारमंच चिंतन रिसर्च फाउंडेशन (सीआरएफ) यांनी आयोजित केलेल्या “सशक्त नारी, विकसित भारत” परिषदेत बोलताना अदाणी फाउंडेशन च्या अध्यक्षा डॉ. प्रीती अदाणी यांनी विकसित भारत 2047 च्या दिशेने भारताच्या विकासप्रवासात महिलांना केंद्रस्थानी असलेल्या शिल्पकार म्हणून मान्यता देण्याचे आवाहन केले.
महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांचे स्वागत करताना डॉ. अदाणी यांनी महिला-नेतृत्वाखालील विकासाला मिळालेल्या धोरणात्मक गतीची दखल घेतली आणि केवळ हेतूपासून पुढे जाऊन सातत्यपूर्ण आर्थिक सहभागाकडे वळण्याची गरज अधोरेखित केली. तळागाळातील अनुभवांच्या आधारे त्यांनी नमूद केले की सक्षमीकरणाची सुरुवात प्रवेशापासून होते. ज्या ग्रामीण भागात औपचारिक शिक्षणाची पातळी मर्यादित आहे, त्या ठिकाणी फाउंडेशनच्या पाठबळाने महिला शेतकऱ्यांना सिंचन, खतांचा वापर, बियाण्यांची निवड आणि बाजारभाव (मंडी) तपासण्यासाठी सोप्या कृषी मोबाईल अॅलप्सची ओळख करून देण्यात आली आहे. माहितीच्या वाढलेल्या उपलब्धतेमुळे उत्पादकता वाढली, उत्पन्न मजबूत झाले आणि आत्मविश्वास वृद्धिंगत झाला आहे.
दुग्धव्यवसाय क्षेत्रात सामूहिक कृतीमुळे उत्पन्नाच्या संधींना नवे रूप मिळाले आहे. फाउंडेशनच्या सहाय्याने स्थापन झालेल्या स्वयं-सहायता गटांच्या दूध संकलन केंद्रांमध्ये आता 3,500 हून अधिक महिला सहभागी आहेत आणि त्या मिळून दरवर्षी 75 लाख लिटरपेक्षा अधिक दूध हाताळतात. पारदर्शक दररचना, गुणवत्तेची तपासणी आणि संघटित खरेदी व्यवस्थेमुळे उत्पन्नातील स्थिरता आणि सौदेबाजीची ताकद वाढली आहे. डॉ. अदाणी यांनी फाउंडेशनच्या प्रमुख मातृत्व व महिला आरोग्य उपक्रम ‘सुपोषण’चाही उल्लेख केला, ज्यामार्फत प्रशिक्षित स्थानिक महिला स्वयंसेविकांनी प्रजननक्षम वयोगटातील 3.25 लाखांहून अधिक महिलांच्या आरोग्यपरिणामांत सुधारणा घडवून आणली आहे. याशिवाय ‘स्वाभिमान’ कार्यक्रमाअंतर्गत 300 उद्योग स्वयं-सहायता गटांमधील 4,500 हून अधिक महिलांना शाश्वत उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
त्यांनी अधोरेखित केले की सक्षमीकरण म्हणजे दानधर्म नव्हे, तर कौशल्ये, वित्तीय साधने, बाजारपेठ आणि नेतृत्वाच्या संधींमध्ये प्रवेश विस्तार करणे होय. अलीकडील केंद्रीय अर्थसंकल्पातील ‘सेल्फ-हेल्प आंत्रप्रुनर्स’ उपक्रमाचा उल्लेख करताना डॉ. अदाणी यांनी सांगितले की हा महिलांना सूक्ष्म कर्जाच्या मर्यादेतून बाहेर पडून वाढीच्या भांडवलासह उद्योगमालक बनण्यासाठी सक्षम करणारा महत्त्वपूर्ण धोरणात्मक टप्पा आहे आणि तो फाउंडेशनच्या ‘सपोर्टिंग हर एक्स्पोनेंशियल एम्पॉवरमेंट’ या चौकटीशी सुसंगत आहे.
उद्योग, प्रशासन आणि ग्रामीण नेतृत्वावरील चर्चांमध्ये एकच संदेश स्पष्ट होता—महिलांचा आर्थिक सहभाग हा भारताच्या दीर्घकालीन समृद्धीचा पाया आहे. आपल्या समारोपपर भाषणात डॉ. अदाणी यांनी संस्थांना संरचनात्मक अडथळे दूर करून संधींचा प्रवेश व्यापक करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की भारताच्या विकासाचा पुढील टप्पा आत्मविश्वासपूर्ण महिलांच्या नेतृत्वाखालील वर्गखोल्या, प्रशिक्षण केंद्रे, ग्रामउद्योग आणि डिजिटल बाजारपेठांमध्ये आकार घेईल.
त्यांच्या समारोपाच्या शब्दांनी स्पष्ट संदेश दिला: “तिला करू द्या. आणि ती नक्कीच करेल.”

0 Comments