Business

Header Ads

भारती एअरटेलची आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी !

गुरुग्राम, भारत, 5 ऑगस्ट 2026 : भारती एअरटेल लिमिटेडने 30 जून 2026 रोजी संपलेल्या तिमाहीचे लेखापरीक्षित एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले. आर्थिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत भारती एअरटेलने दमदार कामगिरी करत 1.49 कोटी नवीन ग्राहक जोडले आणि 15 देशांतील एकूण ग्राहकसंख्या 68.1 कोटींवर पोहोचली. 

कंपनीचा एकत्रित महसूल 18.4 टक्क्यांनी वाढून 58,539 कोटी रुपये झाला, तर भारतातील महसूल 41,214 कोटी रुपये झाला. मोबाईल ग्राहकांकडून मिळणारे सरासरी उत्पन्न (ARPU) 250 रुपयांवरून 264 रुपयांवर वाढले. पोस्टपेड विभागात विक्रमी 10 लाख नवीन ग्राहक जोडले गेले, तर होम ब्रॉडबँड, एअरटेल बिझनेस आणि आफ्रिका व्यवसायातही चांगली वाढ झाली. 

या तिमाहीत एअरटेलने 5G तंत्रज्ञानावर आधारित पोस्टपेड फास्ट लेन सेवा, उद्योगांसाठी एअरटेल सिक्योर वर्कफोर्स सुरक्षा प्लॅटफॉर्म सुरू केला तसेच देशभरात नवीन टॉवर्स आणि फायबर नेटवर्कचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला.

भारती एअरटेलचे एक्झिक्युटिव्ह व्हाइस चेअरमन गोपाल विट्टल म्हणाले की, विविध व्यवसायांतील चांगली कामगिरी आणि प्रभावी अंमलबजावणीमुळे कंपनीने आणखी एका तिमाहीत दमदार कामगिरी केली आहे. भारत आणि आफ्रिका या दोन्ही बाजारांमध्ये महसूल वाढला असून आफ्रिकेतील एअरटेलमधील हिस्सा 79 टक्क्यांहून अधिक करण्यासाठी कंपनीने मोठा शेअर स्वॅप व्यवहार पूर्ण केला. 

भारतात पोस्टपेड विभागात विक्रमी 10 लाख नवीन ग्राहक जोडले गेले, तर 50 लाख स्मार्टफोन ग्राहक वाढले आणि प्रति ग्राहक सरासरी महसूल 264 रुपये झाला. होम ब्रॉडबँड आणि एअरटेल बिझनेस विभागातही चांगली वाढ झाली असून, भविष्यातील वाढ लक्षात घेऊन कंपनी मजबूत आर्थिक स्थितीसह सातत्याने गुंतवणूक करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments